Wednesday, October 29, 2008

एकदा तरी ...




एकदा तरी ...



हाक देईल शेवटची एकदा तरी साद देशील ना
नाही जमलं जिवनात, पण ... स्वप्नात तर येशील ना

थोडा राहीला प्रवास चालेल म्हणतो एकटा मि
नाहि सोबती माझ्या पण... सावलीला तर येशील ना

डोळ्यातील अश्रु पिऊन टाकीन सर्व आता
नाही पुसायला अश्रु पण पाजायला तर येशिल ना

पांघरुन काळी रात्र निजेल शांत कायमचा
स्वप्न मनी रंगन्या नाहि, पण... उषाला तर येशिल ना


एकदा.... एकदा तरी येशिल ना?


Sunday, July 13, 2008

क्षणं....


क्षण उरत नाही पण आठवणी मात्र उरतात.
क्षण संपले तरी आठवणी आयुष्य भर पुरतात.
क्षण सरतात पण आठवणी सरत नाही,
का सरत नाही माझं मलाच कळत नाही.

मनाच्या झाडाला आठवणींचे पानं असतात.
इतर झाडांप्रमाणे तेही खचतात.
खचले तरी मात्र ते कधीच झडत नाही,
का झडत नाही ते माझं मलाच कळत नाही.

मुसळधार पाऊसात तरी घर गळतं.
मोडलेल्या छपरावरणं ते लगेच कळतं
मन जरी मोडलेलं असलं तरी ते कधीच गळत नाही,
का गळत नाही माझं मलाच कळत नाही.......


अाज पुन्हा ....!

अाज पुन्हा मनी पाहता तुझ क्षणी
शब्द ओठी पुन्हा आज आले .

आज फुलल्या मनी त्या जुन्या अाठनणी
नयन माझे पुन्हा आज ओले

तोच चंद्र पुन्हा, तोच क्षण हा जुना
ितच फुलली पुन्हा रात राणी

अाज पुन्हा मनी पाहता तुझ क्षणी
शब्द ओठी पुन्हा आज आले ..........



Wednesday, February 27, 2008

काळोख


अंधाराच्या आडोश्याला बसावस वाटतं।
कोमजलेल्या मंद प्रकाशात भिजावस वाटतं।

त्या मंद प्रकाशात काही आकृत्या नाचतांना दिसतात।
त्यात काही जुने क्षणं तर काही आठवणी असतात।

मग एक एक तो क्षण डोळ्या समोर येतो।
मला तिथेच ठेऊन मनाला मात्र भुतकाळात नेतो।

खरचं मन किती मोठ असतं याच नवल वाटत।
जेव्हा एवड्याशा मनात आठवणींच समुद्र साठतं।

अस वाटतं सारं काही विसरुन जाव।
अंधाराच्या कुशीत शांत निजाव।

पण वाटत तितक सोप नसतं।
कारण उशालाही आठवणींच गाठोड असतं......।

Monday, February 25, 2008

आठवणं


माझा एकांत आणि माझी आठवणं
सतत गोष्टी करत असतात.
आठवणींच्या गोष्टीत एकांत रमुन जातो.
तेव्हा उरते ति फक्त आठवणं।
त्याच जगात रहावं असं बर्‍याचदा वाटतं
पण भितीने आभाळ मनात दाटतं।
पाय तिथल्या समुद्रात गुढग्यापर्यंत भिजलेले असतातं
तेव्हा आठवणी दुर गेलेल्या जहाजागतं दिसतात।
सुर्यही असतोना, आरधा वर आरधा पाण्यात
तो हि कुठे जातो कळत नाही एक अर्ध्या क्षणातं
मग मि पुन्हा,मग मि पुन्हा चालत येतो जिथे मन संपते
वळुन पहाता रेतीवर पाऊलं उमटलेलं असतं
त्यावर्ण लाट जाते पुसून जातात खुना, त्यावर्ण लाट जाते पुसून जातात खुना
परत जातांना लाट मात्र आठवणी देते पुन्हा.....!