
माझा एकांत आणि माझी आठवणं
सतत गोष्टी करत असतात.
आठवणींच्या गोष्टीत एकांत रमुन जातो.
तेव्हा उरते ति फक्त आठवणं।
त्याच जगात रहावं असं बर्याचदा वाटतं
पण भितीने आभाळ मनात दाटतं।
पाय तिथल्या समुद्रात गुढग्यापर्यंत भिजलेले असतातं
तेव्हा आठवणी दुर गेलेल्या जहाजागतं दिसतात।
सुर्यही असतोना, आरधा वर आरधा पाण्यात
तो हि कुठे जातो कळत नाही एक अर्ध्या क्षणातं
मग मि पुन्हा,मग मि पुन्हा चालत येतो जिथे मन संपते
वळुन पहाता रेतीवर पाऊलं उमटलेलं असतं
त्यावर्ण लाट जाते पुसून जातात खुना, त्यावर्ण लाट जाते पुसून जातात खुना
परत जातांना लाट मात्र आठवणी देते पुन्हा.....!
1 comment:
lai bhari yar..... vachun ekdum mast vatate....mag mi map mazya aathvanit harvun jato....
Post a Comment