
अंधाराच्या आडोश्याला बसावस वाटतं।
कोमजलेल्या मंद प्रकाशात भिजावस वाटतं।
त्या मंद प्रकाशात काही आकृत्या नाचतांना दिसतात।
त्यात काही जुने क्षणं तर काही आठवणी असतात।
मग एक एक तो क्षण डोळ्या समोर येतो।
मला तिथेच ठेऊन मनाला मात्र भुतकाळात नेतो।
खरचं मन किती मोठ असतं याच नवल वाटत।
जेव्हा एवड्याशा मनात आठवणींच समुद्र साठतं।
अस वाटतं सारं काही विसरुन जाव।
अंधाराच्या कुशीत शांत निजाव।
पण वाटत तितक सोप नसतं।
कारण उशालाही आठवणींच गाठोड असतं......।
